टिटवाळा : अजय शेलार
टिटवाळा पूर्व येथील मुख्य रस्ता असलेल्या गणेश मंदिर रोडवरील निमकर नाका , पटेल मार्ट, जकात नाका समोरील रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून सर्वत्र मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, पादचारी, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक रहिवाशांचे दैनंदिन जीवन अक्षरशः धोक्यात आले आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. तसेच रस्त्यावर इतरत्र मोठ मोठे दगड पसरले असून परिणामी दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटना वाढण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे रेजन्सी सर्व बिल्डिंग क्रमांक ३० च्या गेटसमोरील परिसरात रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असून विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाने अद्याप ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, हा रस्ता टिटवाळ्यातील अत्यंत वर्दळीचा असून दररोज हजारो नागरिक याच मार्गाचा वापर करतात. तरीदेखील रस्त्याची दुरवस्था कायम असून प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. प्रत्यक्षात मात्र खड्डे बुजविण्याचे किंवा रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याचे काम होत नसल्याचा आरोप येथील नागरिक किरण पवार यांनी केला आहे.
दरम्यान, जनताहित फाउंडेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रितेश प्रकाश कांबळे यांनीही या गंभीर समस्येबाबत संबंधित प्रशासनाशी पत्रव्यवहार करून तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली असल्याची माहिती दिली. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या निष्काळजीपणाकडे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही. प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास नागरिकांच्या वतीने सर्व कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी रितेश कांबळे म्हणाले, “टिटवाळा पूर्व आणि पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. प्रत्येक छोट्या-मोठ्या समस्येसाठी नागरिकांनी वारंवार प्रशासनाला पाठपुरावा करावा लागतो, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. नागरिकांनी भरलेल्या करातून संबंधित अधिकाऱ्यांचे वेतन दिले जाते. त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होणे योग्य नाही. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून टिटवाळ्यातील सर्व खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाला आवाहन केले आहे की, मोठा अपघात किंवा जीवितहानी होण्याची वाट न पाहता गणेश मंदिर रोडसह टिटवाळ्यातील सर्व खड्डेमुक्त रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवास करता येईल.
विशेष म्हणजे रेजन्सी सर्व बिल्डिंग क्रमांक ३० च्या गेटसमोरील परिसरात रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असून विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाने अद्याप ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, हा रस्ता टिटवाळ्यातील अत्यंत वर्दळीचा असून दररोज हजारो नागरिक याच मार्गाचा वापर करतात. तरीदेखील रस्त्याची दुरवस्था कायम असून प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. प्रत्यक्षात मात्र खड्डे बुजविण्याचे किंवा रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याचे काम होत नसल्याचा आरोप येथील नागरिक किरण पवार यांनी केला आहे.
दरम्यान, जनताहित फाउंडेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रितेश प्रकाश कांबळे यांनीही या गंभीर समस्येबाबत संबंधित प्रशासनाशी पत्रव्यवहार करून तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली असल्याची माहिती दिली. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या निष्काळजीपणाकडे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही. प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास नागरिकांच्या वतीने सर्व कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी रितेश कांबळे म्हणाले, “टिटवाळा पूर्व आणि पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. प्रत्येक छोट्या-मोठ्या समस्येसाठी नागरिकांनी वारंवार प्रशासनाला पाठपुरावा करावा लागतो, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. नागरिकांनी भरलेल्या करातून संबंधित अधिकाऱ्यांचे वेतन दिले जाते. त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होणे योग्य नाही. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून टिटवाळ्यातील सर्व खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाला आवाहन केले आहे की, मोठा अपघात किंवा जीवितहानी होण्याची वाट न पाहता गणेश मंदिर रोडसह टिटवाळ्यातील सर्व खड्डेमुक्त रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवास करता येईल.











Leave a Reply